मराठी ब्लॉग विश्व

Wednesday 15 February 2012

याला जीवन ऐसे नाव..

कुणीतरी म्हणालं मला, आता नकोसं झालंय जिणं..
चौऱ्याऐंशी लक्ष जन्मानंतर, मिळे मनुष्य जन्माचं लेणं....

मानव जन्म सर्वश्रेष्ठ, नाहीतर डुकरे ही जगतात..
काय भले अन काय बुरे, हे अनुभवातून शिकतात....

करी गर्जना वाघाची, पण कुंपणापर्यंतच धाव..
घागर भरून वाहिली, तरी सुटेना याची हाव....

घोडा जाई अडीच घरे, परी प्यादं एकच घर चाले..
भाली लिहिले असेल तितुकेच, विधाता झोळीत घाले....

सुख दु:खाचा लपंडाव हा, जीव होतो बेजार..
झोळी काल ही भरलेली, आज छिद्रे ज्यास हजार....

प्रात:काली उगवलेला, रवी संध्येला मावळतो..
घटिका येताच यमदेवाचा, दोर मानवा आवळतो....

आयुष्य गेले उटारेटी, भांडण तंटे अन रगामध्ये..
मृत्यू समीप येऊन ठाकता, जीव हा गुंते जगामध्ये....

म्हणूनच म्हणतो मित्रांनो.....

वाढले असेल जे पुढ्यात, त्यावर खुशाल मारा ताव..
क्षणभंगुर हा खेळ तयाला, जीवन ऐसे नाव....

---------- वैभव फाटक ----------(२१/०७/२०११)

No comments:

Post a Comment